Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Friday, May 25, 2018

आया, चल आपण clock-clock खेळूयात!

...ही आज्ञा महिकाने मला दिली आणि माझे विचारचक्र सुरु झाले. खरे तर क्लॉक कसे चालते, किती वाजले, हे सर्व कळायला अजूनही ती लहान आहे.

अजूनही "काल" ला "आज" किंवा "उद्या" वापरते ती: "आया, आम्ही उद्या गार्डन मध्ये एक नवीन game खेळलॊ."

ह्या चिमुरडीला क्लॉक कसे समजवायचे!

मग मीच एक शक्कल लढवली.

Sticky Notes घेतल्या. त्यावर महिकालाच १ ते १२ हे क्रमांक लिहायला दिले. व्यवस्थित गोलाकार जागा दाखवून
तिला घड्याळासारखे सर्व क्रमांक फरशीवर लावायला सांगितले.

आता काटे कसे करायचे? महिकाला मग समजावले, घडाळ्यात तीन काटे असतात: तास काटा, मिनिट काटा, आणि सेकंद काटा. तिला सांगितले, मिनिट काटा बन! मी बनले तास काटा.

शाळेकरता उठायची वेळ आणि शाळेची van घ्यायला येते तो पर्यंत महिका काय काय करते, कसे करते, किती वेळ घेते, काय-काय म्हणते हे सर्व म्हणून आणि करून दाखवलं! आणि ह्या सर्व वेळेत महिका खरोखरी काट्यांसारखी गोल-गोल फिरत होती!

काय मज्जा अली! जरी तिला घड्याळ वाचायला कळले नसले तरी वेळेचे महत्व कळले असेल तरी छान! त्यात role - playing  झालं, तिला "running" करायचे होते घरात तेदेखील झाले!

एकूणात, एक वेगळा खेळ झाला! फारच गम्मत!

Monday, July 3, 2017

(पावसाळ्यातले) रस्ते

वर्षा ऋतू असे सुंदर नाव असणारा आणि खरोखरी आनंददायी अश्या ऋतुचीदेखील एक unavoidable आणि त्रासदायक गोष्ट आहेच - रस्ते!

पावसाळ्यातले रस्ते हा सगळ्यांचाच अतिशय जिव्हाळयाचा विषय! कितीही बोललो त्यावर तरी ते कमीच असते. 

कडक उन्हाळा सोडून, पावसाळ्याच्या सुरवातीलाच महापालिकेला रस्ते उखडायचे असतात! बरं ही कामं लवकर आणि वेळच्या वेळेस संपली तर महापालिका कसली! बरोब्बर पावसाळ्याआधी खणलेले रस्ते पहिल्या पावसात धोकादायक डबकी होऊन जातात. "माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळशी सर्व पसारा" हे वाक्य तंतोतंत खरं व्हावं, ह्याकरता अविरत धडपड चालू असते खोदणाऱ्यांची. 

मग भर पावसात गाडी ह्या अग्निदिव्यातून, सॉरी, पाणीदिव्यातून नेण्याची परीक्षा आपली. प्रत्येक डबकं हे जेव्हडं खोल, रुंद, आणि भरीव असेल तेव्हढं कसब वाहनचालकांना लावावं लागतं. मला वाटतं महापालिका ही असली डबकी मुद्दाम बनवते. पावसाळ्याच्या ऋतूत RTO च काम कमी व्हावं असा सुप्त हेतू असणार. कारण ह्या डबक्यांना avoid करत तुम्ही गाडी zigzag चालवू शकलात तरंच तुम्हाला गाडी 'हाकायचा' परवाना मिळणार असे RTO चा गुप्त नियम असणार. 

खड्डे चुकवीत अथवा तुडवीत गाडी चालवून अगदी हेच आठवतं: "फिरत्या चाकांवरती पाठीला होतात विकार, बाईक असो वा कार!" म्हणजे खरं तर ह्या खड्डयांमुळेच कित्येक orthopaedic डॉक्टर्सचा गुजारा चालू आहे. जनकल्याणाचे अखंड कार्य पालिकाच करू शकते. 

पण त्याशिवाय अश्या खड्ड्यातून जाण्याची एक गम्मत आहे खरी. तुमची जर लहानपणची उंटावरून सैर करायची हौस राहिली असेल तर ती खड्ड्यातून जाताना पूर्ण होईल. तुमच्या पुढ्यात एखादी गाडी नाही हे बघून खड्ड्यातून जाताना ५ सेकंद डोळे मिटा... तुम्ही स्वतः उंट चालवत आहात असे नक्कीच जाणवेल तुम्हाला!

अश्या पावसाळ्यातल्या जलमय रस्त्यांवरून तुम्ही तुमच्या इष्ट स्थानी वेळेत आणि धड पोचलात तर तुम्हाला "सर्वात जागृत वाहनचालक" ही पदवी मिळेल असे पालिकाने जाहीर केल्याचे ऐकिवात आहे! पहिला मानकरी कोण असेल?

Wednesday, June 28, 2017

का?

महिकाचे 'का' प्रश्न सुरु झालेत. इतके की कधी कधी आपल्याकडेपण उत्तर नसतं त्यांचं.

काल रात्री महिका आणि तिच्या बाबाचं 'Knowledge sharing session' चालू होतं. काय काय प्रश्न विचारले तिने बाबाला!

पहिला वाहिला प्रश्न: "बाबा, आपण जेवण का करतो आणि पाणी का पितो?"

किती 'basic' प्रश्न झाला! पण तिच्या बाबाने खूपच छान उत्तर दिले. तिला कळेल आणि पटेल अश्या भाषेत. त्या नंतर तर प्रश्नांचा भडीमार होता. हर एक प्रश्न वेगवेगळा.

"बाबा animals आपल्या बरोबर घरात का नाही राहत, जंगलात का राहतात?"

"बाबा आपण newspaper का वाचतो?"

"आपण घरात का राहतो?"

"सिग्नल का असतात?"

"आपण खुर्चीवर का बसतो?" (How cute and funny!!)

"How shall we make a cake?"

"How shall we make a tomato?"

"How shall we make bhaji and roti?"

रात्री सगळे प्रश्न संपले नाहीत की काय म्हणून सकाळ-सकाळी उठल्या-उठल्या मला एक-दोन प्रश्न:

"आया, आता तू सांग. आपण घड्याळ का घालतो?"

"झाडाला फुलं का असतात?"

हे सर्व प्रश्न ऐकून त्यांना समर्पक उत्तरं द्यायची ही आपली जवाबदारी.

पण खरं तर ह्यातून हेच दिसतं की ही लहान मंडळी किती वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतात आणि किती कुतूहल असतं त्यांना!

लहानग्यांचे भावविश्व, विचारसरणी, आणि imagination हे असेच विस्मयकारक असो! कायम असे प्रश्न सुचो आणि उत्तरं पण मिळो हीच मुलांना शुभेच्छा!

लहानपणची निरागसता आणि curiosity आपण मोठे होताना का बरं हरवून जाते? 

Friday, February 17, 2017

आवाज कोणाचा???

महानगर पालिका निवडणुका तोंडावर आल्यात. वातावरण सगळीकडेच चांगलेच तापले आहे.

कुठला पक्ष जिंकणार ह्याकडे सगळ्यांचे लक्ष आहेच. पण तत्पूर्वी, निवडणुकांची धामधूम बघायला मज्जा येत आहे. रस्त्यारस्त्यावर रिक्षा, bikes, बसेस, आणि मोर्चे ह्यातून प्रचार होत आहे.

प्रत्येक उमदेवार हा "गरिबांचे दुःख जाणणारा, त्यांच्या समस्या सोडवणारा, हळवा, कर्तव्यदक्ष, सुशिक्षित, आणि शब्द पाळणारा" आहे. प्रत्येक उमेदवाराने भरपूर (खाबू) कार्ये केली आहेत, म्हणूनच तो/ती जनतेची आवडती आहे. (म्हणून तर प्रत्येकाची कित्येक कोटी मालमत्ता आहे.) निवडून आलो तर काय काय करून जनतेचा सेवक म्हणून कार्यक्षम राहू हे प्रत्येक जण पटवून देत आहे.

ह्या निवडूणुकीत प्रचार केवळ सभा, भाषणे ह्या पुरता मर्यादित नाही राहिलेला. मतदारांना स्वतः जाऊन भेटणे, इथंपासून, मतदारांच्या भ्रमणध्वनीवर फोन/sms इथपर्यंत सर्व युक्त्या वापरायला जात आहेत.

एकमेकांच्या पक्षांना नावं ठेवणे, कुरघोड्या करणे, कार्यकर्त्यांमध्ये वाद घडवून आणणे येथपासून 'आमुक आमुक शहर देशोधडीला लावण्याचे काम" विरोधी पक्ष करत आहे इथपर्यंत वाद-प्रतिवाद चालू आहेत. खरं किती, खोटं  किती हे जाणकार मतदार जाणतातच. तथापि सर्व उमेदवारांची हि बाचाबाची बघायला, ऐकायला गम्मत वाटते.

ह्या निवडणुकीत मला जाणवलेली गोष्टं अशी कि अपक्ष उमेदवार बरेच आहेत. त्या सगळ्यांची चिन्हे फारच गमतीशीर. नारळ, शिट्टी, कप-बशी, क्रिकेट खेळणारा खेळाडू, मेणबत्त्या, टेबल, खुर्ची, गॅस सिलेंडर, कॅमेरा, कंगवा,फुगा ह्यासारखी अनेक चिन्हे!!!! साधारण हजाराच्यावर उमेदवार रिंगणात आहेत. बहुदा अपक्षांची संख्या जास्त असावी.

ह्या रणधुमाळीत, कोणी जिंकेल, कोणी  हरेल! कोणाचे नशीब फळफळेल, कोणी अगदी हिरमुसून जाईल!! आवाज कोणाचा येईल??? मतदारांचा की खणखणाऱ्या नाण्यांचा???

Sunday, October 27, 2013

मांजर

गेल्या  आठवड्यात, मी आणि संजीव जेवायला गेलो रात्री बाहेर. तसा उशीर झाला होता. गप्पा आणि जेवण होई पर्यंत रात्रीचे अकरा वाजले. हॉटेल मधून बाहेर पडलो तेव्हा नेहेमी सारखे valet पार्किंग करता दिलेली गाडीची किल्ली मिळाली आणि आम्ही गाडीच्या दिशेने चालायला लागलो.

जेवण छानच झाले होते, त्यात गप्पा पण भरपूर झाल्या होत्या. एकंदरीत तृप्त वातावरणात घरी जायच्या विचारात आम्ही होतो.

तितक्यात छोट्या मांजरीच्या पिल्लाचा आवाज आला. मी आजूबाजूला बघून आवाज कोठून येत आहे ह्याचा शोध घ्यायला सुरु केला, पण काही केल्या मांजर दिसेना. संजीवने गाडी पार्किंग मधून काढण्यास सुरु केली, आणि अचानक मला ते पिल्लू आमच्याच गाडीच्या खालून ओरडत आहे असे लक्षात आले.

मी संजीवला सांगितले गाडी हळूच मागे घ्यायला जेणे करून ते पिल्लू आपोआप मागे राहील आणि गाडीच्या खालून बाहेर पडेल. पण पिल्लू इरसाल निघालं. जशी गाडी मागे जात होती, तसं ते अजून पुढे-पुढे जात होत. पिल्लाला काही गाडीच्या खालून बाहेर पडायचं नव्हतं.

आता आली का पंचाईत! आमची गाडी रस्त्याच्या मधोमध तिरकी, त्यात चालक बसलेला. गाडी सुरु होती, पण गाडी ना पुढे नेता येत, ना मागे.

पार्किंग attendant च्या लक्षात आले काही तरी गडबड आहे, म्हणून तो आला विचारायला. त्याला सांगितले की गाडी खाली मांजर आहे. तो प्रयत्न करू लागला पिल्लाला हुस्कावायला. पण पिल्लू हुशार निघालं. एक माणूस आपल्याला आपल्या लपायच्या जागेतून बाहेर काढत आहे ते त्याला समजलं. त्याने अजून एक युक्ती केली. पुढच्या चाकावर जाऊन बसलं. attendant  अजूनही "छुत छुत" करून पिल्लाला हाकलायचा प्रयत्न करत होता.

मांजर आता चाकावर बसल्याने गाडीला हलवणे अशक्य झाले होते. गाडी रस्त्यात तिरकी बंद पडलेली दिसते, काही मदत लागत आहे का बघावी ह्या उद्देशाने एका बाईक वरून दोघे जण गाडीजवळ आले.

"गाडी बंद पडली आहे का? काही मदत करू का?" अशी विचारपूस केली.

"अहो, बंद नाही पडलेली. चाकावर मांजर शिरून बसलंय. हालातच नाहीये"

"काय?! चाकावर मांजर कसं काय चढलं?"

"गाडीखाली लपलं होतं. बाहेर काढत होतो आम्ही, तर चाकावर चढून बसलं."

हा संवाद चालू असताना पिल्लाने अजून एक पराक्रम केला. चाकावरून चक्क आत bonnet मधेच शिरलं. गाडीचं  इंजिन चालू होतंच, मस्त गरम-गरम ऊबदार ठिकाणी बसायची जागा पटकावली. आता मात्र हद्द झाली! आता पिल्लाला बाहेर काढायचं कसं?

एका बाजूला हा गोंधळ सुरु होता तर नेमकं त्याच वेळेस संजीवच्या ऑफिस मधली एक मैत्रीण तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर त्याच हॉटेलच्या बाहेर उभी असलेली संजीवने बघितली. तिचे पण लक्ष गेले तर ती आली आमच्याशी बोलायला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून देऊ लागली.

माझे तर काही लक्षच नव्हते तिच्या बोलण्याकडे. ओळख करून दिली तिने तसं "hi" वगैरे बोलून झालं. पण चिंता होती की ते पिल्लू बाहेर काढायचं कसं. ज्या वेळेस ओळख करून देणं  चालू होतं, त्या वेळेस आमच्या गाडीच्या bonnet  मध्ये चार अनोळखी लोकांची डोकी खुपसून मांजरीला शोधणे सुरु होते.

आता ह्या चार डोक्यांमध्ये आतून आलेला वेटर पण शामिल झाला. एका माणसाने त्याच्या मोबाईलचा flash light चालू केला.

"अरे, ती बघा तिथे आहे, दिसली का?"

"कुठे?"

"तिथे खोपच्यात बसली आहे."

"हां, हां, दिसली. हात जातोय का बघ ना."

"इंजिन गरम आहे. आणि जागा नाहीये हात घालायला."

तेव्हड्यात कोणीतरी खराट्याच्या दोन काड्या आणल्या. bonnet मध्ये घालून, मांजरीला हुसकावण्याचा प्रयत्न करत होते. पण काही केल्या पिल्लू बाहेर येईना. अखंड "म्याव म्याव" चालूच होतं.

सगळा गोंधळ बघून मैत्रिणीचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा प्रश्न, "गाडी बंद पडली आहे का? मेकानिक ला बोलवायचा का? अर्ध्या तासात येईल मदत."

"अहो, गाडी ठीक आहे. गाडीला काही नाही झालेलं. bonnet मध्ये मांजर शिरली आहे."

"मांजर कशी काय शिरली? रिट्झ गाडी मध्ये शिरते माहित होतं, पण तुमच्या असल्या गाडीत पण शिरेल वाटलं  नव्हतं."

"आता माहित झालं ना!" मी माझ्या मनात म्हटलं.

तेवढ्यात कोणाच्या डोक्यात कल्पना सुचली माहित नाही, पण कोणी तरी पाण्याची बादली घेऊन आलं. मोबाईलच्या flash light च्या अंधुक प्रकाशात नेमकी मांजर कुठे बसली आहे ह्याचा अंदाज घेऊन पाणी ओतलं गेलं. तसं त्या पिल्लाने बचावात्मक पवित्रा घेऊन bonnet मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण पूर्णपणे बाहेर न येता, पुन्हा एकदा चाकावर बसण्यास पसंती दिली.

"निघाली, निघाली! गाडी खाली दिसत आहे का?"

"नाही खाली नाही आली अजुन."

"मग आवाज कुठून येत आहे?"

"अरे ही बघा, परत चाकावर बसली आहे."

"अरे घाल बिनधास्त हात. पिल्लाला काय घाबरतोस! चाकावर आहे तर पकडून काढ बाहेर!" असा सल्ला देणाऱ्या गृहस्थाच्या मित्राने शेवटी हिम्मत करून, चाकावर नखाने घट्ट पकडून बसलेल्या, बिथरलेल्या, बिचाऱ्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढले आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला!

वीस मिनिटे चाललेल्या नाटकाचा अंत शेवटी आम्ही सगळ्या अनोळखी लोकांच्या आभार प्रदर्शनाने केला. म्हणजे प्रसंग असा होता की गाडी आमची, पण आम्ही काहीही करू शकलो नाही. बाकीच्याच सर्व लोकांनी अथक प्रयत्न करून पिल्लाला तर वाचवलेच, पण आमची पण सुटका केली.

मांजर हे कुठे कुठे शिरू शकतं हे त्या दिवशी मला उमगले. 

Thursday, August 29, 2013

रात्रीचे भजन

काल जन्माष्टमी. मुरली मनोहराचा आगमनाचा दिवस. खरं तर रात्र. रात्री झालेला जन्म आपल्या कृष्णाचा.
ह्या शुभ रात्री शेजारच्या मारुतीच्या देवळात रात्री साधारण दहाच्या सुमारास भजन सुरु झाले. रात्री श्रीकृष्णाचा जन्म होई पर्यंत चालू असावे.

असावे म्हणाले कारण मला भजन संपायच्या आधीच झोप लागली. खूप शांत झोप. कित्येक वर्षांत भजन ऐकता-ऐकता झोपण्याचे भाग्य लाभले नव्हते. ते काल रात्री जमले.

खरे तर भजन म्हणणाऱ्या लोकांचे आवाज काही खूप खास नव्हते. पण तरीही खूप तन्मयतेने भजन चालू होते. टाळ-मृदुंग, आणि हरी नामाचा जप ह्याने आसमंत दुमदुमून गेला होता. हवेतील कुंद गारवा भजनाचे आवाज दश-दिशांना घुमवत होता.

मला आठवण झाली काही वर्षांपूर्वीची. आमच्या घराजवळच्या मारुतीच्या मंदिरात दररोज रात्री भजन होत असे. तेव्हा रात्री झोपताना भजनाचे हलके स्वर आणि टाळ. खूप आल्हादायक वातावरण व्हायचे. तेच काल रात्री अनुभवायला मिळाले.

आज-काल भजन पण ओघानेच ऐकायला मिळते. गावा-पाड्यात अजून होत असतील रात्रीची. पण शहरात अभावानेच.

भजनाकरिता काही सुरेख आवाज असण्याची गरज नाही. मनात भाव असला की ते थेट अंतःकरणात भिडते. म्हणूनच भजन म्हणायला कोणी "Indian Idols" लागत नाहीत. भोळे-भाबडे, कष्टकरी लोक जमवले की झाले.

थोड्याच वर्षांमध्ये आपले म्हातारे-कोतारे लोके पण नाहीशी होतील, तेव्हा भजन म्हणजे काय हे सुद्धा
सांगणारे उरणार नाहीत. तोवर आपण भजनाच्या रंगी रंगून जाऊयात. 

Thursday, March 28, 2013

समाधी साधन…

हे भक्तीगीत ऐकले की मी एकदम वेगळ्याच जगात जाते. जुने दिवस आठवतात. घरातले त्या वेळेला घडलेल्या घटना जशाच्या तशा डोळ्यांपुढे राहतात. खरं तर त्या घटना काही एकदम वेगळ्या अशा नाहीत. पण कसे कोण जाणे, पण ह्या गाण्याचे आणि त्या गोष्टींचे एक association झाले आहे माझ्या मनात.

कालंच ऑफिस मधून परतत असताना हे गाणं कारमध्ये ऐकलं. डोळ्यांसमोर पहिली गोष्ट उभी राहिली ती म्हणजे पाठमोरी आई ओट्याजवळ, चपात्या करताना. वेळ आहे सकाळी पावणे आठची.

आणि मग पूर्ण दृश्य उभे रहिले. शाळेचे आणि कॉलेजचे दिवस आठवले. आई सकाळी उठून आमचा डबा बनवायची. त्या वेळेस आमच्याकडे चपात्या करायला बाई नव्हती. आईच करायची. तिच्या चपात्यापण किती मस्त व्हायच्या. एकदम खुसखुशीत, माऊ, आणि ताज्या. तव्यावरची एक गरम-गरम चपाती घ्यावी, आणि नुसती खावी. काय स्वाद असायचा! मला 'समाधी साधन' हे बाबूजींचे गाणे ऐकले की तो चपात्यांचा घमघमाट पण येतो.

आम्ही कायम उशीरा उठायचो शिकत होतो तेव्हा. आई दररोज ओरडायची. चपात्या करत असताना स्वयंपाक घरातून आवाज द्यायची. सकाळी सात पासून. आम्ही कसे-बसे आठ-सव्वा आठला उठायचो. तो पर्यंत आईची भाजी टाकून झालेली असायची आणि चपात्या सुरु झालेल्या असायच्या. 

बरोब्बर त्याच वेळेस सकाळी रेडिओवर भक्तीसंगीत लागायचे. अजूनही लागते म्हणा. बरोब्बर त्या वेळेस उठणं व्हायचं. बाबा काम करत असायचे, सकाळच्या आवरा-आवरीचे. आणि आम्ही निवांत कशा-बशा उठणार. "किती हाका मारतेस!" असे म्हणतच उठायचो. 

मग आमची हळू-हळू गाडी सरकणार पुढे आवरायला. आरामात तयार होवून, मग शाळा अथवा कॉलेजला स्वारी निघणार. तो पर्यंत आई-बाबा, दोघांचे आवरायचे, आणि ते पण त्यांच्या कामांना बाहेर पडायचे. 

सगळ्यांचाच नवा दिवस सुरु व्हायचा, भक्ती संगीताने आणि खमंग चपात्यामुळे!

Tuesday, November 27, 2012

दरवळणारे सुगंध

गरम-गरम, आलं घातलेला, वाफाळलेला चहा...एका झटक्यात सकाळ सुवासिक बनून जाते. अशा चहाचा गंध घेऊन ज्याला चहा प्यायचा मोह होत नसेल, तो माणूसच काय!

प्रत्येक सकाळ ही एक नवीन सुगंध घेऊन येते. कधी पावसाची चाहूल, कधी थंडीची ऊब, तर कधी उन्हाचा तडाखा. प्रत्येक दिवसाचा जसा रंग न्यारा, तसाच सुगंधही. दिवस कसा असेल हे प्रत्येक सकाळच्या सुवासावरून कळते.

चैत्र महिन्यात वसंताची चाहूल लागते. सकाळी उठून एक उल्हासित सुगंध दरवळत असतो. जणू सांगत असतो की झाडांना नवी पालवी फुटणार आहे. नवीन आशा, नवीन स्वप्ने, नवीन आकांक्षा. सारं काही नवीन. निरभ्र आभाळाखाली एक दीर्घ श्वास घेऊन सभोवतालचा आनंद आपल्यात सामावून घ्यावा आणि मगच दिवसाची सुरवात करावी.

जशी उन्हाची तीव्रता वाढते, तसाच सुगंधही बदलतो. एक तीक्ष्ण असा सुवास येणाऱ्या तप्त दिवसाची चाहूल देऊन जातो. उष्णता त्या एका सुगंधात लपली असते. हा सुवास जेव्हढा उष्ण, तेव्हढाच कोरडा. सूर्य आता तापला आहे आणि आता कोणाची खैर नाही असा प्रेमळ इशारा असतो.

पण याच दिवसात एक अजून अलौकिक सुगंध घराघरांत दरवळत असतो. एका टोकरी मध्ये बंद करून ठेवलेल्या त्या फळांचा सुवास घरा-दारात भरून राहिला असतो. उगाच नाही त्याला फळांचा राजा म्हणत. खरा तर आंब्याच्या सीझनला असा एक दंडकच केला पाहिजे की  सर्वांनी उठल्यावर प्रथम आम्रसुगंध घ्यावा, आम्र-फळास वंदन करावे, आणि मगच दिनचर्येस सुरवात करावी. तसे न केल्यास आजन्म आंब्यांना मुकावे ही शिक्षा.

जसा आंब्याचा सीझन संपत येतो तसा येणाऱ्या वर्ष ऋतूची चाहूल देऊन जातो. "आज भयंकर उकडतंय, नाही?" "पाऊस येणार वाटतं!" "पाऊस येउदे एकदाचा, खूप झाला उन्हाळा!" असल्या उद्गारानीच आपण पावसाळ्यास सज्ज होतो.

सकाळपासूनच हवेत आर्द्रता जाणवत असते. मेघगर्जनेसह वळवाचा पाऊस हजेरी नक्की लावणार असे वाटत राहते. सकाळच्या दमट सुगंधाने शुष्क झालेल्या मनाने उभारी घेतलेली असते. पण नेहेमीसारखाच पाऊस हुलकावणी देऊन जातो.


कधीतरी रात्री धुमाकूळ पाऊस पडून जातो. सकाळचा पहिला श्वास तुम्हाला रात्रीची कथा सांगून जातो. वातावरणात, वळवाच्या पाऊसाने केलेला पहिला स्पर्श अजूनही तरळत असतो सकाळच्या धुंध वासात.


वर्षा ऋतूच्या विलक्षण सौंदर्यात धरती न्हाऊन गेलेली असते. दररोज सकाळी अधिकाधिक बहरत जाणारी झाडं, फुलं, पानं, सगळंच  विलोभनीय असतं. याच दिवसात पारिजातकाचा वेड लावणारा सुगंध तुमची सकाळ मोहवतो. रातोरात खुलणारी रातराणी, जाई-जुई, सायली, आणि मोगरा, या फुलांनी तर सर्व आसमंत भरून जातो.


सकाळ-सकाळी फुलांनी लगडलेल्या पारिजातकाच्या झाडाखालून कधी गेला आहात? किंवा, झाडाखाली कोणी हिऱ्यांचा सडा टाकला आहे, असे भासवणाऱ्या फुलांना वेचायला कधी गेला आहात का? फुलांचा सुगंध तर अप्रतिम असतोच. पण झाडाखाली पडलेली फुले वेचतावेचता, जेव्हा झाडावरून पडणारी फुले कधी आपल्या पायाशी, तर कधी आपसूक परडीत येऊन पडतात, तेव्हा काय अप्रूप वाटते! आणि नुसतीच फुले नाहीत, तर त्याबरोबर पानांवरून गळणारे टपोरे थेंब, कधी हातावर, तर कधी पाठीवर पडतात, आणि अंगावरून एक सुर्रकन शिरशिरी जाते.


पारिजातकाची फुले हातात घेऊन बघा, आणि त्यांचा सुगंध मनात साठवा. ओंजळ रिकामी केलीत, तरी सुगंध तसाच टवटवीत आणि मोहून टाकणारा येईल तुमच्या हातांना.


पावसाच्या सुरवातीस अजून एका प्रकारच्या वासाची खासियत आहे. सगळ्यांनाच हा वास आवडेल असे काही नाही. पण आहे मात्र या सीझनचे खास वैशिष्ट्य! छत्री आणि रेनकोट यांचे वास. वर्षभराने काढलेले छत्री आणि रेनकोट यांना नेहेमीच एक वेगळा, खास पावसाळी वास येतो. या वासाने मला कायम बेडकाची आठवण होते.


या दिवसात आपल्याला अजून एका वासाची सवय होते, किंबहुना सवय करून घ्यावी लागते. ओल्या, दमट कपड्यांचे वास. आपण कितीही प्रयत्न केला, पूर्ण झाकणारा रेनकोट-टोपी हे सोपस्कार केले, तरीही कपडे ओले होतातच, आणि लवकर वाळत पण नाहीत. आज पाउस येणार नाही, या विश्वासाने आपण बाहेर पडलो की पाउस हमखास आपल्याला फसवणार. मग ओलं होवून घरी येण्याशिवाय गत्यंतर नसतो. शिवाय रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना तुमचा कोरडेपणा रुचत नाही. ते पावसाची कमी पुरी करतात. एकुणात कपडे ओले राहून दमट वासाची सवय होते.


असे भिजून आल्यावर कांदाभजीचा वास खुणावतो, आणि "खाण्यासाठी जगावे" ते पटते. गरम-गरम भाजीचा वास का एकदा नाकात गेला की मग ना पावसाचे भान, ना ओल्या कपड्यांचे.


श्रावण येतो आणि खाण्याची रेलचेल सुरु होते. नुसतीच सुवासित फुले नव्हे, तर खरपूस, खमंग, जीभेचे चोचले पुरवणारे, एक-से-एक, पदार्थ आपल्या खाद्य संस्कृतीत आहेत.


दर श्रावणी शुक्रवारी एक वेगळा पदार्थ. जीवती देवीच्या व्रतामुळे दर शुक्रवारी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. एका शुक्रवारी पुरणपोळीचा घमघमाट असतो. खीर, घावन, आरत्या, चवाचे कानवले या सगळ्यांचा एका पाठोपाठ क्रमांक लागतो. दर शुक्रवारी कामावरून घरी शिरल्या-शिरल्या असा काही मस्त वास येतो की ते वाण-बीण बाजूला राहिलं, लागलीच पानावर बसावे.


हे झालं शुक्रवारचे. पण श्रावणात तर प्रत्येक दिवसच साजरा करण्यासारखा असतो. घराबाहेर पावसाने चिंब झालेल्या मातीचा सुवास, तर घरात वेगवेगळ्या रुचकर पदार्थांचा. नागपंचमीला फळे, शिळसप्तमीला सांजा, पौर्णिमेला नारळी भात असले स्वादिष्ठ  पदार्थ. 


नागपंचमी ला मेंदीचा धुंध सुगंध. ओल्या मेंदीचा, हातावर सुकलेल्या मेंदीचा, आणि रंगलेल्या मेंदीचा सुगंध वेगवेगळा येतो. जितकी मेंदी रंगते तितकी मज्जा वाटते. पण जशी फिकी पडते तसं वाईट वाटतं. नक्षीदार मेंदीने सजलेले हात जेव्हा पूर्ववत बेरंग होतात, तेव्हा वाईट वाटते. पण आश्चर्य म्हणजे त्या पांढऱ्या हातांनापण अजून एक अती सूक्ष्म सुवास येत असतो!

खमंग, सुरमट, साजुक तुपातला नारळी भात घेऊन नारळी पौर्णिमा येते. पाठोपाठ येते जन्माष्टमी. दूध-पोहे आणि दही-पोहे इतका सोप्पा आणि टेस्टी नैवेद्य घेऊन!


मग वाट पाहतो आपण गणपतीच्या दिवसांची. धूप-दीप, अगरबत्ती, फळे, केवड्याची पाने, कमळाची फुले, लाल जास्वंदीची फुले, दुर्वा, पेढे, खोबरं-साखर, साखरफुटाणे, खारीक-खोबरं, सर्व गोष्टींचे मिसळण होवून एक अनामिक मंगलमय वातावरण तयार होते, बेहद्द आल्हादायक!

गौऱ्या घरी आल्या की आनंदाला उधाण येते. चिवडा-लाडू, करंज्या, अनारसे बनवले जातात आणि स्वागताची जय्यत तयारी होते. खीर-घावन, वरण-पुरण, वालाचे बिरडे, बटाट्याची भाजी, पुऱ्या, श्रीखंड, लोणचे, पापड, अगदी लिंबूच्या फोडीचा वास देखील पोटातल्या अग्नीला आहुती वाहतो.

विसर्जनाच्या दिवशी घाटावर जाऊन नुसते उभे राहिले तरी भरपूर फायदा होतो. घराघरातल्या विसर्जित होणाऱ्या गणरायांचे दर्शन होते. शेवटच्या कर्पुरारतीच्या सुवासाने आसमंत भरून गेलेले असते. आरत्या आणि "पुढल्या वर्षी लवकर या" या घोषात उत्साह शिगेला पोचतो. या सगळ्या उत्सवाचा आनंद तर घेता येतोच, पण त्या शिवाय अजून एक मोठा फायदा म्हणजे वाटल्या डाळीचा प्रसाद मिळतो. त्याकरिता तुम्ही घरातलेच असायला पाहिजेत असा काही नाही हां! येण्या-जाणाऱ्या सगळ्यांना मिळतो हा प्रसाद. कधी सुकी डाळ तर कधी ओली. पण त्याशिवाय गणरायाला निरोप कसा द्यायचा?

गणेश विसर्जना नंतरचे दोन आठवडे म्हणजे आपल्या पूर्वजांना प्रसाद देण्यासाठीचे दिवस. आपापल्या पितरांना श्रद्धांजली वाहिली जाते ती घरोघरी. हा काही सार्वजनिक सण नाही. तरीदेखील जेव्हा घरी "तीथ" असते, तेव्हा गोड वडे, तिखट वडे - खीर, आमसुलाची चटणी. गवार-भोपळ्याची, कारल्याची, भेंडीची भाजी, कढी हे सर्व पदार्थ केले जातात. मला तिखट वडा - खीर हे combination कमालीचे आवडते, अगदी कायम पण खाऊ शकते.

पितृपंधरवडा संपतो न संपतो तोच नवरात्र सुरु. नवरात्र म्हटला की मला आठवतं आमच्या घरी बाबा धूप लावतात दररोज संध्याकाळी तेच. आमच्या आईकडे देव बसवतात. सकाळ-संध्याकाळ पूजा आणि आरती. संध्याकाळच्या आरतीच्या वेळची घंटा आणि धुपाचा सुगंध मन एकदम प्रसन्न करून टाकतात.

घरी सवाष्णी घालतात त्या दिवशी चंदनाचा सुगंध येत असतो. चुलीवर मसाला दूध उकळत असते. एका बाजूस सर्व सवाष्णीना द्यायला घरचे विडे बनवले जात असतात. अश्या वेळेस मसाला दूध आधी घ्यावे की पान खावे हेच कळत नाही.

दसऱ्याच्या दिवशी पुरी-श्रीखंड हा बेत ठरलेला. श्रीखंडामध्ये भरपूर जायफळ घालायचे...नुसत्या वासानेच दुपारची वामकुक्षीची guarantee. दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून सकाळी पुजायला ठेवतो तेव्हाचा त्यांचा वास आणि संध्याकाळच्या पानांचा वास वेगवेगळा असतो. संध्याकाळची पाने थकलेली, उदास वाटतात. पटकन कुस्करली जातात. कुस्करलेल्या पानांना पण वेगळा वास येतो.

दसरा संपतो आणि दिवाळीचे वेध लागतात. पावसाळा संपून हिवाळ्याकडे वाटचाल सुरु झालेली असते. पण म्हणून काही रविराजाला विसरता येत नाही. दिवसभर चांगलाच तापतो आणि तापवतो. पण संध्याकाळी गारवा पसरतो. दिवसा पानगळतीचा वास खूपच मस्त वाटतो.

आणि एक दिवस गल्ली-बोळातून जाताना बेसन भाजल्याचा घमघमाट येतो, आणि लक्षात येते की आली दिवाळी चार दिवसांवर. रस्त्या-रस्त्यांवर आकाशकंदील दिसायला लागतात. कुठे चकली, कुठे शेव, चिवडा, लाडू, शंकरपाळ्या, अनारसे, ह्या सगळ्या फराळामुळे दिवाळीची वाट आपण उत्सुकतेने बघायला लागतो. नवीन कपडे घेतले जातात. तुम्हाला आवडतो का नवीन कपड्यांचा वास? मला खूप आवडतो. दसरा - दिवाळी निमित्त घेतलेल्या नवीन कारच्या interior चा वास पण आवडतो.

आम्ही लहानपणी मौज म्हणून दिवाळीला "मोती चंदन" साबण आणायचो. दिवाळीच्या दिवशी पहाटे-पहाटे नवीन चंदन साबणाचा सुगंध, घराबाहेरून फटाक्यांचा वास, आणि सकाळचा थंडीचा वेगळाच सुगंध ह्याचे एक विलक्षण मिश्रण तयार व्हायचे.

भरपूर आनंद देऊन दिवाळी संपते आणि मग कडाक्याच्या थंडीचा मौसम सुरु होतो. भर थंडीत, अगदी दुपारीपण गोधडी घेऊन झोपावे, असे मस्त वातावरण होते. तेव्हा दुपारी उन्हात गेले की थंडीचा वास दरवळत असतो. याच दिवसांमध्ये दुपारच्या चारच्या वाफाळलेल्या चहाचे महत्व कळते.

जानेवारीमध्ये संक्रांत येते गुळपोळी घेऊनच. गरम-गरम गुळपोळी, त्यावर चमचाभर साजूक तूप, आणि चवीला बटाट्याची भाजी. ह्या combination ला तोडच नाही.

मग येतो वर्षातला शेवटचा सन, होळी! रंग, फुगे, पाणी, संध्याकाळची होळी, अन अर्थात पुरणपोळी. प्रत्येक सणाची काय वेगळी मजा असते ना! संध्याकाळच्या पेटलेल्या होळीने सर्वत्र गर्मी पसरते. येणाऱ्या वसंत ऋतूची चाहूल अलगद देऊन जाते.

वर्षभर वेगवेगळे सुगंध घेऊन आलेले ऋतुचक्र पुनश्च सुरु होते. गतवर्षीच्या विविध सुवासाची पुंजी घेऊन नवीन वर्षात आपणही जायला सज्ज होतो!

Friday, September 28, 2012

ती. बाबांस आणि सौ. आईस,

ती. बाबांस आणि सौ. आईस,

शि. न. वि. वि. पत्र लिहिण्यास कारण खरं काहीच नाही. सहज मनात आलं, की तुम्हा दोघांशी पत्रातून बोलावं. म्हणून हा प्रयत्न. खरं तर मी तुम्हा दोघांना खूप जास्त miss करते. बऱ्याच वेळेस असं वाटतं की तडक तुम्हाला येऊन भेटावा. पण वेळे अभावी नाही जमत.

आज लग्न होवून दोन वर्ष होत आली. मी रुळले आहे नवीन घरी, नवीन ठिकाणी. तरीही तुमची आठवण पदोपदी आल्यावाचून राहत नाही. आज आई-बाबा काय करत असतील? आई निघाली असेल का कामाला ? बाबांचे क्लास्सेस कसे चालू असतील? असे कायम विचार येतात.

तसे आता "रुटीन" चालू झाला आहे. खर तर, काही महिन्यांपूर्वी असे व्हायचे की खूपच आठवण येते आहे तुमची. पण आता, जसे प्रत्येक जण सवय करतो, तशी मला पण झाली आहे सवय तुमच्या शिवाय राहायची. तुम्हा दोघांना पण झाली असेल कदाचित. तुम्ही "मुलगी सुखात आहे" यातच तुमचा सुख मानता. पण म्हणून मला तुमची आठवण येत नाही असे नाही.

घरात स्वतः काही गोष्टी करताना विचार येतो, की मी कशी होते लग्नाआधी. मग विचार येतो की आई-बाबांबरोबर कसे करायचे मी ह्या गोष्टी. मग थोडा लग्नाआधी करायचे ते, आणि मला जे बरोबर वाटते, अथवा करता येते, जसे करता येते तसे, असे दोन्ही एकत्र करून एक वेगळ्या प्रकारे केला जाते. त्यात पण गम्मत आहे.

आधी सगळेच नवीन आणि वेगळे वाटायचे. पण आता माझा स्वतःचे वेगळे आयुष्य चालू आहे. काही गोष्टी ज्या मी आधी कधीच करायचे नाही त्या करते. आधी ज्या करायचे, त्या आता बिलकुलच करत नाही. खूपच वेगळे आहे, तरीदेखील सारखेच आहे. प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला असेच काहीसे अनुभव येत असणार.

मला फक्त कधी-कधी असे वाटते की मी मुलगी असल्याने तुमच्या जवळ नाही राहू शकत. त्याही पेक्षा, मुलगी म्हणून स्वतःच्या आई-बाबांची जबाबदारी कमी, आणि सासू-सासर्यांची जास्त, हे बऱ्याच वेळेस ऐकते, त्याचे वाईट वाटते. तुम्ही देखील किती तरी वेळेस म्हणाले आहात...की आता त्या घरचे आधी सांभाळायचे. त्याचे थोडे वाईट वाटते. मग जास्त आठवण होते. असा आपल्या समाजात का विचार केला जातो, हेच कळत नाही. आणि आवडत त्याहून नाही.

मला कायम वाटत राहते, की शेवटी मुलीच्या आई-बाबांचे हात रिक्तच राहतात का?

असो! एव्हडेच सांगायचे होते की मी मजेत आहे. काळजी करू नये. पण तुम्ही दोघे नक्की स्वतःची काळजी घ्या.

तुमचीच,
प्राजक्ता

Tuesday, September 18, 2012

आठवणी लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या

आज हरतालिका! आणि उद्या गणेश चतुर्थी. सकाळी उशीरच झाला उठायला. पूजा-अर्चा नाही झाली सकाळी. फक्त देवीला हळद-कुंकू वाहिले. दररोज सारखी office ला पण आले. कामामध्ये थोडा विरंगुळा, म्हणून office cafeteria मध्ये उभी होते, तेव्हा एकदम लहानपणीच्या गणपतीच्या आठवणी आल्या.

आम्ही लहान होतो तेव्हा आई हरतालिकेच्या दिवशी उठवून नाहायला लावायची. माळ्यावर कुठे तरी जपून ठेवलेली, जी फक्त तिलाच माहित असायची कशाची आहे ते, ती plastic ची पिशवी काढायला लावायची. उघडून बघावे आत तर काय! वाळू! मग आई आम्हाला त्या वाळूने पाटावर हरतालिका देवीच्या दोन बाहुल्या शेजारी-शेजारी, आणि त्यांच्या पुढ्यात महादेवाची पिंडी, असे तयार करायला लावायची. (उजवीकडे काढून दाखवले आहे.)

मग त्या पाटावर साग्रसंगीत पूजा व्हायची. हळद-कुंकू, गंध, अक्षता, फुले, पत्री, हे सगळे वाहायचे, दूध-साखरेचा नैवेद्य दाखवायचा. एखादे फळ असेल तर ते देखील ठेवायचे देवापुढे. त्या नंतरच खायला मिळायचे. भूक लागलेली असायची. पण "आजच्या दिवस तरी जरा दम धर" असे सकाळीच ऐकवलेले असायचे. मग गपचूप पूजा व्हायची वाट बघायची.

आम्ही खरी वाट बघायचो ते हरतालिकेच्या संध्याकाळची. आई ऑफिस मधून कधी येते त्याची आतुरतेने वाट  बघत असायचो. कारण संध्याकाळचे मुख्य आकर्षण असायचे...शनिवार वाड्यावर जाऊन गणपती बघायचे.

आमच्या घरी गणपती नसतो. म्हणून आई-बाबा आम्हाला घेऊन जायचे सगळे वेगवेगळे गणपती बघायला. काय मज्जा यायची! सर्व प्रकारचे गणपती असायचे...मोरावर बसलेला, हत्तीवर बसलेला, सिंहासनावर शिवाजी महाराजांसारखा, साई बाबांच्या वेषात, मुषकावर, वीणावादन करणारा, कृष्णासारखा डोक्याला मोराचे पीस असलेला, आणि किती तरी विविध रूपे.

खूप सारे काका-काकी आजू-बाजूला असायचे गणपती बाप्पाला घरी न्यायला आलेले असायचे. किती तरी मुले बाप्पांना घेऊन जात असायचे. एखादी हातगाडी दिसायची. त्यावर आठ-दहा छोटे-मोठे गणपती असायचे. सगळ्यांची तोंडं झाकलेली. एखाद्या चाळीतील सगळी मुले गोळा झालेली असायची, जोरजोरात ठरवा-ठरवी चालायची त्यांच्या मुलांच्या मंडळाचा गणपती कुठला ठरवायचा ते.


शनिवार वाड्याच्या त्या पटांगणावर पूर्ण फेरफटका मारायचो आम्ही. रात्री उशीरा पर्यंत. इतके सारे सुंदर गणपती बघून डोळे दिपायचे. मग आमच्या comments असायच्या...हा गणपती एकदम बेरकी दिसतोय, तो फारच cute आहे, हा छोटा फारच मिश्कील आहे. तो मोठावाला कॉमेडी दिसतोय. एकाचा डोळा जरा तिरका आहे, तर दुसऱ्याचे पोट जरा जास्तच बाहेर. काही गणपती "कृष्ण-धवल" असायचे, म्हणजे एक पूर्ण पांढरा, तर दुसरा एकदम कृष्ण सारखा काळा. काही ugly वाटायचे, तर काही जात्याचे सुंदर.

असे करत-करत कधी रात्रीचे दहा वाजायचे कळायचे नाही. मग दर वर्षी सारखे आम्ही विचारायचो: "एक छोटी मूर्ती न्यायची का?" मग नेहेमीचा संवाद व्हायचा.

"नाही न्यायची!"
"पण का??"
"आपल्याकडे गणपती नाही आणत."
"पण का म्हणून? सगळ्यांकडे असतो. आपल्याकडेच का नाही?"
"नाही."
"पण काय होता नेला तर? वाटल्यास पूजा नको करायला त्याची."
"अगं असे नाही चालत. मूर्ती आणली की पूजा-अर्चा सगळी करावी लागते."
"मग करूयात ना."
"आपल्यात नाही करत."

शेवटी मग compromise म्हणून दोन कमळं घ्यायचो. त्या कमळांचा काही उपयोग नसायचा, तरी घ्यायचो. आणि ते गणपतीमागे लावतात चक्र, ते देखील घ्यायचो.  just मज्जा म्हणून. त्यातच आनंद मानून घरी परतायचो.

मग दुसऱ्या दिवशी गणपती बसायचे. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असायचे, त्या सगळ्यांकडे संध्याकाळी जाऊन यायचे. गौरी-गणपती असतील, त्यांच्याकडे जाऊन यायचे. बिबवेवाडी, धनकवडी, मार्केट यार्ड, असे पुणे दर्शन करून घरी परतायचे.

विसर्जन ज्या दिवशी असेल, दीड दिवस, पाच दिवस, गौर-गणपती जातील तेव्हा, त्या सगळ्या दिवशी घाटावर जायचे. विसर्जनाची मज्जा बघायची, आणि मुख्य म्हणजे वाटली डाल, खिरापत, आणि पेढे, असे वेगवेगळ्या, अनोळखी लोकांच्याकडून पण प्रसाद मिळायचे. काय मौज वाटायची! आणि सगळे लोक अनोळखी लोकांना पण प्रसाद वाटतात. अतिशय उत्साही आणि मंगल वातावरण असायचे.

एव्हड्यात दहा दिवस कधी संपायचे कळायचे नाही. आदल्या-मधल्या दिवशी रात्री आई-बाबा गणपती दाखवून आणायचे. दगडूशेठ हलवाई, मंडई, तुळशीबाग, बाबू गेनू, जिलब्या मारुती, हिराबाग, खडकमाळ, जोगेश्वरी, कसबा गणपती, नातूबाग, गुरुजी तालीम, हत्ती गणपती, असे किती तरी. सगळे चालत-चालत बघायचे. कधी कधी थोडा पाऊस असायचा. पण तरी सगळे गणपती cover करायचे. कणीस खायचे आणि चालत-चालत फिरायचे. खूप धम्माल केली.

अनंत चातुदशी च्या दिवशी आमच्या काकांकडे अनंताची पूजा असते. मग आम्ही त्या दिवशी सकाळी अकरा पर्यंत जायचो त्यांच्याकडे. आई प्रसादाला कायम बोटव्याची खीर करून न्यायची. येत-जाता किती तरी मिरवणुका दिसायच्या.

रात्री लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक बघायला जायचो. शेवटचा दगडूशेठ हलवाईचा गणपती गेला, की एकदम खाली-खाली वाटायचे. आता गणपतीची भेट एकदम पुढल्या वर्षीच, असे मनात म्हणत घरी परतायचे.

आज इतक्या वर्षांनी सगळ्या गोष्टी जश्याच्या तश्या डोळ्यां पुढे उभ्या राहिल्या. खूप nostalgic वाटले. आठवणी पण साठवून ठेवाव्यात, असे वाटून गेले, म्हणून पटकन लिहून काढले. या पुढे पण गणपती उत्सव होईलच, ढंग नक्कीच वेगळा असेल!

Wednesday, May 2, 2012

Visiting Vishrambaug Wada

Vishrambaug Wada, is a nice old style wada situated in the heart of the Pune city. For shoppers who are well-known with Tulshibaug won't find it difficult to find this place. It's just opposite the entrance to Tulshibaug on Bajirao Road. Lot of confusing names for the newcomer in Pune. But don't worry. Just hop into a rickshaw and ask the rickshaw-wallah to take you to Vishrambaug Wada. You'll be alighted right at its entrance.

Inside of Vishrambaug Wada
So...to start with the history, this palace or Wada as it is called in Marathi, was built in 1807 at a cost of Rs. 2,00,000, which was a whooping cost at that time. It was owned by Peshwa Bajirao II, who stayed there for around 11 years before he was imprisoned by the British.

In 1821, a Sanskrit school was started in Vishrambaug Wada. Government Engineering College (now called COEP), Deccan College, Pune University, and Agricultural University were all had their humble beginnings here in Vishrambaug Wada.

A well inside Vishrambaug Wada
An interesting placard in the Wada mentions that William Wordsworth had written to the Public Works Department (PWD) complaining of the unhygienic conditions of the Wada at that time. I am really not sure if this could be true. Need to verify that. Nevertheless, it does give a different charm to the Wada.

At this Wada are now some municipal offices such as the Birth and Death Registration Office, Post Office, and a few shops are also operative.

What is also of some interest is a very small showcase of old buildings and structures in Pune, right from Council Hall, Gokhale Hall, Kasba Ganpati, Mandai, and various other notable structures. Miniatures of all these noteworthy buildings are on display. But this showcase seriously needs a makeover. More information about these buildings, clean and bright environment, old photographs, and many more interesting facets of life in Pune in the 18th and 19th centuries will make this a veritable source of information. This display is for free now. But I wouldn't mind paying if they upgrade it.

Also. if they take some serious restoration work for the Wada, make a few more rooms open to the general public by providing them information and entertainment, I am sure it will work wonders for not just tourism, but also for our glorious history.

Wish someone does take some efforts!

Friday, March 23, 2012

Monday, October 17, 2011

Bird In The Car

Today, there were feathers all over in my car. There was fluttering of feathers and frantic attempts to escape. And how it all started, we have absolutely no idea.

It was actually a bird that got into the car as we drove. We were on the highway, going to office. Suddenly, I heard some noise in the rear just like a plastic bag makes when it flutters in the wind. And then, there were feathers all over. My first thought was that some chicken feathers had got in from the tempo that carries chickens and hens.

But then I saw in the rear mirror and and was amazed to see a red-vented bulbul trying to escape through the closed windows. I stopped the car. Sanjeev got down and opened the boot and the left rear door. The poor birdie had panicked and was sitting near the left rear door. Sanjeev shooed it off and it took flight out of the door, glad to be ridden of the closed cage.

We were laughing for so long at the amazing and rare incident. The only way the little bird could have got in was through my open window. It probably wanted to fly across the road before my car passed. But with its mistaken timing and the speed of my car, it zoomed into my car instead of across. Poor soul! What fearful moments it must have had before it could escape! But, it could escape and be free! 

I can only say this: पक्ष्यांचे पण अंदाज चुकू शकतात!

Wednesday, August 4, 2010

Tribute To Babuji

29th July 2002 was when we lost this great man: Sudhir Phadke. His heavenly voice, his music, his compositions are incomparable. I am too small a midget to describe or comment on his music. Here's my tribute to Babuji: listing some of my favourite songs by Babuji.

अशी पाखरे येती
तुझे गीत गाण्यासाठी
स्वयंवर झाले सीतेचे
तोच चंद्रमा नभात
का रे दुरावा
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे
राजहंस सांगतो प्रीतीच्या तुझ्या खुणा
आज कुणीतरी यावे
एकाच या जन्मी जणू
बोलले इतुके मज श्रीराम
चंद्र आहे साक्षीला
फिटे अंधाराचे जाळे
जीवलगा कधी रे येशील तू
पराधीन आहे जगती
स्वये श्री रामप्रभू ऐकती
लाडकी शकुंतला
एक वार पंखावरूनी
स्वर आले दुरुनी
सखी मंद झाल्या तारका
शेवटचा करी विचार फिरून एकदा

The list is endless!

Friday, July 16, 2010

कोट, टोपी, आणि धोतर घातलेले आजोबा

काल मी सकाळी साधारण साडे आठ वाजता झेड पुलावरून जात होते. तेव्हा बघितलं अश्या एका आजोबाना. स्वच्छ, पांढरे धोतर, छानसा फिकट पिवळा कोट, आणि डोक्यावर काळी टोपी. पुलावरून खाली पाण्यात बघत होते. इतके छान होते ते.
असले आजोबा आता दुर्मिळच.

खरंच, आजचे आजोबा सगळे hi-tech झाले आहेत. धोतर-टोपी तर सोडाच, साधा सदरा घातलेले आजोबा पण दिसत नाहीत. हल्लीचे आजोबा directly T-Shirt, Jeans, कॅप, आणि काय-काय नवीन fashionable कपडे घालतात.

तसं बघायला गेला तर आजकालच्या आज्ज्या तरी कुठे नऊवारी साड्या घालतात? त्या देखील पंजाबी ड्रेस घालतात, काही आज्ज्या तर अगदी Jeans, T-Shirt देखील घालतात. हा आहे आजच्या एकविसाव्या शतकातील "change."

म्हणजे हा बदल चांगला नाही असा मी नाही म्हणत. पण असले आजोबा किंवा नऊवारी घातलेल्या आज्ज्या दिसल्या की एकदम भूतकाळात जातो आपण आपसूक. आपले स्वतःचे आजी-आजोबा आठवतात. आणि मग त्यांनी आपले केलेले सगळे लाड पण.

आज्जी बरोबर दुपारची कामं केलेली आठवतात. दुपारची कामं म्हणजे सांडगे करणे, पापड करणे, कसले-कसले मसाले करणे. काय-काय असायचं. आणि दुपारी कपडे धुणाऱ्या बाई आल्या की आज्जीची साडी वाळत घालायच्या. तेव्हा आणि अजूनही असं वाटतं की केवढी मोठ्ठी ती आज्जीची साडी! हाल्ली साधी पाचवारी साडी घालायला पण कंटाळा येतो.

आजोबा आमच्या करता संध्याकाळी काय-काय आणायचे: गोळ्या, कणसं, बोरं, गरम-गरम खरी, चण्या-मन्या बोरं...फार मज्जा यायची.

आज्जीने एक मोडक्या घड्याळ घेऊन आम्हाला घड्याळ बघायला शिकवल होता. पण आता परत कशी आणू शकू आपण ती वेळ???

Thursday, July 1, 2010

Here They Come With टाळ And चिपळ्या!

The पालखी will be here next week. With the chant of "Gyanba Tukaram!" they will usher in the festival season.

Palkhis remind me of those long processions, those वारकरी, all swaying to the rhythmic sound of टाळ and चिपळ्या crossing miles and miles on foot, having that one goal in sight, of reaching Pandharpur, the abode of Vithu Mauli. Palkhis are something that make me awe-struck. This परंपरा  as we call it in Marathi, the yearly यात्रा has continued for the past thousand years. Isn't it wonderful that so many warkaris walk this walk every year? Can we do it even once in our lifetime?

In Pune, some years back, Palkhis used to take a different route. They used to pass through the Appa Balwant Chowk (ABC.) My Babai (Aai's Aai) used to stay right in that chowk, next to Prabhat talkies. Now that house is pulled down for road-widening. But I remember when we were kids, all us cousins together would wait eagerly for the Palkhis. We would crowd ourselves in the small windows on the first floor to see the processions, the warkaris; wait eagerly, craning our necks to get दर्शन of Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhis. It was always an exciting time.

I agree that when these palkhis come to our cities and towns and villages, we face a lot of issues. We face traffic jams, overcrowding, unclean places when they move to their next destination. But no one can doubt their spirit, their perseverance, their भक्ति. I know one of my friend, will disagree with all I have said here about Palkhis. But I still believe that Palkhis are one of the wonders in Maharashtrian culture.


When Palkhis passed our town, we knew that Ashadhi Ekadashi was coming soon. Ashadhi Ekadashi means साबुदाणा खिचडी. Most Maharashtrians fast on this day to pay obeisance to Vithu Mauli. We kids were just interested in the sabudana khichadi that we used to get then. Even now, I savour the test of that khichadi that's made on Ashadhi Ekadashi.

So with Palkhis the festival season begins. Shortly after Palkhis we have the month of श्रावण. Shravan means rains. Shravan means mehendi. Shravan means awesome delicacies such as ukdichya shenga on Naagpanchami, kothimbir vadya, tandalachi sandani on Shil Saptami, narali bhaat on Narali Pournima, purnachya karanjya, puranpolya, chavachya karanjya. Shravan means Shravani Somvar, Shukrawar-cha vaan. Shravan means raksha bhandhan. Shravan means Janmashtami. Shravan also means listening to those कहाणी which invariable start with "आट-पाट  नगर होतं," and end with "ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तराची सुफळ संपूर्ण."  Shravan means fun.

Right after, come Gauri-Ganpati. I don't need to tell how important this festival is for us. Every household celebrates it. Everyone eagerly welcomes Lord Ganesh at home and is equally unhappy to bid them goodbye. Ganpati means pandals on roads and music on loudspeakers. It's the time to check how many aaratis you have by-hearted. It's time to check how good can you dance the "Ganpati Dance" on the visarjan day. Ganpati means celebrations.

After a hiatus of 15 days when we pay our respects to our ancestors, we are back to celebration time.

After worshipping Shri Ganesh, it's time to worship Durga Mata. नवरात्री is celebrated with great enthusiasm. There are yatras at almost all Devi mandirs, be it Mahalaxmi, Tuljabhavani, Ekaveera Devi, and various other forms of Adi Shakti! Not just that, this is the time to worship the स्त्री शक्ति through haldi-kunku ceremonies. And how can you forget the garba and Bengali Durga Pooja that mark the Navratri celebrations! The festival ends on दसरा! Dushera means distributing gold in the form of आपटा leaves. (Thank God! I can't imagine everyone distributing real gold, what with gold prices reaching sky-high.) Dushera also means sweets and a sumptuous meal of पूरी-श्रीखंड. It's the traditional sweet that has to be made on Dushera in a Maharashtrian household. Ask Chitale Bandhu!

Then comes दिवाळी! Lights, firecrackers, sweets, new clothes, new plans, new purchases, the list is never-ending. Getting up early to bathe with uttna, to light the first fataka, wearing brand new clothes and visiting temples early morning, visiting Sarasbaug, Parvati, or even Omkareshwar for Deepotsavs, visiting relatives, posting cards wishing Diwali greetings, all make Diwali what it is. Diwali brings in sweets, all kinds of them, karanjya, ladus, shankarpalya, anarase, chiwada, chirote, shev, chakli, and what not! Rangoli, diyas, akaashkandil, kille, and Diwali holidays for schools...I just can't wait for Diwali!

And then it ends like all good things. Intense four months of festivities end abruptly when Diwali is over and there's a definite lull in the feel-good quotient. Of course, as months go by, we have Tulsi Vivaah, Kojagiri Pournima, Datta Jayanti, Holi Pournima, Ranga Panchami to celebrate. But nothing can surpass the excitement of those four months of Shravan to Kartik.

Let the feast begin! (Dumbledore-style!)

Thursday, April 15, 2010

Lights Off

For 10 whole hours! The reason: Unknown! How do you survive in the heat? Just exist!!

This is really ridiculous! Can you even imagine how difficult it is stay without a fan for hours together in this sweltering heat? This has happened twice now.

This is the scene in our city. Imagine the state of rural India where there are no lights for almost 12-14 hours a day every day!

"Sarkar cha doka thikanyavar ahe ka?"

To Dear Papa

Happy Birthday!

It's my dad's birthday today according to the Hindu calendar. Interestingly, no one, not even he himself knows his real birthdate. No one knows neither his birthdate, nor the year. We just know his birthday according to the Hindu calender. It's the last day of the first Hindu month of Chaitra, and this year, it is today.

But we know one thing certainly, and that is that he was born. Because he is.

Today, I wish him many more such wonderful birthdays. I wish him health and happiness. I wish him peace of mind.

On this day, I want to salute the person that he is. His wealth of knowledge, his calm and quiet nature, his adherence to values, his punctuality, his constant and quiet support to what he feels is correct and right, and yet his stubbornness, his at-times whimsical nature, all make him what he is.

He is an English professor primarily. But he is also proficient in Sanskrit and Marathi. He has taught Sanskrit to junior college students. He has taught Marathi to German, American, and Indian students. It's amazing to see him literally play with these languages.

You will notice his mastery over all these languages when you hear him play with words as if juggling knives. He is apt to make you laugh with a few words spoken with a very straight face and a plain tone. His repartee is just unconquerable.

Obviously, if he is angry with you, the way he will show his displeasure is unique too. He'll seldom raise his voice. But what he will say will be such that you won't understand what has hit you until it's too late. And then too, he will have made you speechless. Beware, it could at times be quite nasty and possibly a below-the-belt attack. But you probably earned it.

Very recently, he did the MS-CIT course. His tremendous will power to learn about the world of computers is very admirable. And he passed that exam in flying colours. Hats off to you, Baba!

Moreover, like all men of his age, he is so much aware of his surroundings. He is up-to-date with the latest political happenings. He is also aware of the latest Bollywood gupshup. It's amazing how he finds time to know all that!

But there is one thing that he doesn't like much. He generally doesn't like watching movies. Especially if it is at home. If I make him go for a movie in a theatre, he will do that. But if you ask him to watch a movie at home, he will make some excuses. In fact, he will suggest a good movie that's on TV. He will watch it till the first advertisement break and then quietly slip off to read his books.

Yet, he has a few favourite movies: Sarfarosh, A Wednesday, Hum Aapke Hain Koun! And he never misses a single episode of the daily Marathi soap Agnihotra. He generally never stays up late after 11 in the night, but if he misses watching Agnihotra at prime time, he stays up to watch it at 11 p.m. That's his solidarity for his only favourite serial.

There's one another thing that he is amazing at. Baba loves to search for books on the footpath. He loves visiting the footpath-vendors who sell books; I call them that for a better name. His favourite one is the one who sells books on the Lakdi Pul. He has bought a wonderful collection of Perry Mason books, religious books, P. G. Wodehouse books, and other interesting books from him. And he will buy them at a meagre Rs. 20-30. It's such excitement when he comes home with a new Perry Mason book!

Baba loves listening to classical music. He is a fan of Pt. Vasantarao Deshpande, Pt. Kumar Gandharva, Pt. Bhimsen Joshi. But he also appreciates film songs-Hindi and Marathi as well as newer songs that are really worth it. His favourite song from the new generation music is the Kajra Re song. He simply loves it!

Today, on his birthday, I wish him lots of love! Love you, Papa!

Thursday, March 11, 2010

Free Haircut

I had a free haircut today. It was done at home, in a very cosy, friendly environment.

The only difference was that I could not see in the mirror. But I could see the excitement in the eyes of my little hairdresser. He was so excited to have his first customer. And I behaved in a very apt first-customer-like manner. I gave him all freedom to bring out his creativity by turning and twisting my head just as he wanted while he gave me a new style.

He was so happy to see that when he was styling my hair, they fell all over my eyes and he could exclaim that nothing (my eyes) could be seen through the curtain of my hair. And because I was his first customer, he also invented a new vocabulory: when my hair fell all over my eyes, he called them "Kes sandlet!" which means my hair was spilling over.

And the best part of the haircut was that it was done using a playing card by my dear Nanu! All inspired from his own "cutting" that he had on Monday! What luck!

Would you like to have one?

The Moral Compass

Screech! I braked hard as a teenager cut me off from the opposite direction. I took a deep breath, trying to regulate my body after the adre...