Friday, September 28, 2012

ती. बाबांस आणि सौ. आईस,

ती. बाबांस आणि सौ. आईस,

शि. न. वि. वि. पत्र लिहिण्यास कारण खरं काहीच नाही. सहज मनात आलं, की तुम्हा दोघांशी पत्रातून बोलावं. म्हणून हा प्रयत्न. खरं तर मी तुम्हा दोघांना खूप जास्त miss करते. बऱ्याच वेळेस असं वाटतं की तडक तुम्हाला येऊन भेटावा. पण वेळे अभावी नाही जमत.

आज लग्न होवून दोन वर्ष होत आली. मी रुळले आहे नवीन घरी, नवीन ठिकाणी. तरीही तुमची आठवण पदोपदी आल्यावाचून राहत नाही. आज आई-बाबा काय करत असतील? आई निघाली असेल का कामाला ? बाबांचे क्लास्सेस कसे चालू असतील? असे कायम विचार येतात.

तसे आता "रुटीन" चालू झाला आहे. खर तर, काही महिन्यांपूर्वी असे व्हायचे की खूपच आठवण येते आहे तुमची. पण आता, जसे प्रत्येक जण सवय करतो, तशी मला पण झाली आहे सवय तुमच्या शिवाय राहायची. तुम्हा दोघांना पण झाली असेल कदाचित. तुम्ही "मुलगी सुखात आहे" यातच तुमचा सुख मानता. पण म्हणून मला तुमची आठवण येत नाही असे नाही.

घरात स्वतः काही गोष्टी करताना विचार येतो, की मी कशी होते लग्नाआधी. मग विचार येतो की आई-बाबांबरोबर कसे करायचे मी ह्या गोष्टी. मग थोडा लग्नाआधी करायचे ते, आणि मला जे बरोबर वाटते, अथवा करता येते, जसे करता येते तसे, असे दोन्ही एकत्र करून एक वेगळ्या प्रकारे केला जाते. त्यात पण गम्मत आहे.

आधी सगळेच नवीन आणि वेगळे वाटायचे. पण आता माझा स्वतःचे वेगळे आयुष्य चालू आहे. काही गोष्टी ज्या मी आधी कधीच करायचे नाही त्या करते. आधी ज्या करायचे, त्या आता बिलकुलच करत नाही. खूपच वेगळे आहे, तरीदेखील सारखेच आहे. प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला असेच काहीसे अनुभव येत असणार.

मला फक्त कधी-कधी असे वाटते की मी मुलगी असल्याने तुमच्या जवळ नाही राहू शकत. त्याही पेक्षा, मुलगी म्हणून स्वतःच्या आई-बाबांची जबाबदारी कमी, आणि सासू-सासर्यांची जास्त, हे बऱ्याच वेळेस ऐकते, त्याचे वाईट वाटते. तुम्ही देखील किती तरी वेळेस म्हणाले आहात...की आता त्या घरचे आधी सांभाळायचे. त्याचे थोडे वाईट वाटते. मग जास्त आठवण होते. असा आपल्या समाजात का विचार केला जातो, हेच कळत नाही. आणि आवडत त्याहून नाही.

मला कायम वाटत राहते, की शेवटी मुलीच्या आई-बाबांचे हात रिक्तच राहतात का?

असो! एव्हडेच सांगायचे होते की मी मजेत आहे. काळजी करू नये. पण तुम्ही दोघे नक्की स्वतःची काळजी घ्या.

तुमचीच,
प्राजक्ता

4 comments:

  1. Changla lihilays. Pan phakta ekach khatakla. Mulichya aai vadlanche haat riktach rahatat asa apan pan vichar ka karaycha? Mala tari asa vatta...kunihi aso...mulga/mulgi...as parents apli jawabdari aahe ki tyanchya pankhan madhye ektyani udta yeil evdha bal dyaycha. Aai wadlan pasun lamb rahatana dukhkha hotach. you even miss them terribly. pan asahi aahe...ki te rikta aahe ha vichar karnya peksha tyanni kiti chaan tyancha kartavya paar padla aplyala vadhavtana ha vichar adhi karuyat. then we will see their satisfaction...albeit our tears :)

    ReplyDelete
    Replies
    1. Tujhi comment awadli. Aplya aai-vadilani khupach chaan paar padle ahet tyanchi kartavya. Apan aplya ghari sukhat ahot, hyatach tyanche sukh ahe. :)

      Delete

Those Pesky Household Chores

Ten o' clock at night and I just finished sending the last email of the day. The dinner is done, and the kid is about to go to bed. &quo...